भाजपची लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे वाटचाल - डॉ. प्रकाश आंबेडकर

भाजपची लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे वाटचाल - डॉ. प्रकाश आंबेडकर

कराड/प्रतिनिधी : 
                         भाजपकडून पक्षांसह त्यांच्या नेत्यांवर चौकशीची टांगती तलवार ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा माणूस तिहार जेलची क्षमता वाढवल्याचे सांगतात. याचा अर्थ आमच्या आवाज उठवाला, चुका दाखवाल, जनतेची बाजू घेऊन बोलाल तर त्यांना जेलमध्ये टाकू असाच आहे. त्यामुळे भाजपची सध्या लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे वाटचाल चालू असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली. 
                       येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अँड. संभाजीराव मोहिते, सचिव सचिन माळी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडागळे, भरत लोकरे, बाळकृष्ण देसाई संजय करपे उपस्थित होते.